http://sunilbambal.blogspot.in/

Thursday, August 6, 2015

माझी शिवाजी शाळा (१९/०३/२०१५) लेख-०८

           मी तसा जेमतेम विद्यार्थी , मला शालेय स्तरावर ५० ते ६० च्या मध्ये गुण मिळणारा,पाचवी पासूनच आमचा वर्ग दुर्लक्षित असल्यासारखा होता. त्या वेळी शिक्षक घरी शिकवणी वर्ग घेत याला आमचे अंबेडहारे सर ही अपवाद नव्ह्ते. मी शिकवणी लावलेली नव्हती. घरची परिस्थिती हि नव्हती तशी,,,,, कि मी शिकवणी लावु शकेल. वर्गात त्याचं विशेष लक्ष नव्हत …जर असता तर आमचा वर्ग सर्वात ढ नसता. पायाच कमजोर राहिला त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे आम्ही दहावीला पूर्ण वर्गातून फक्त ७ मुल अन दोन मुली पास झालो होतो.
आमचा वर्ग हुशार नव्हता पण आमच्या वर्गात एक हिरा होता,,,तो म्हणजे सुभाष लहाने, अतिशय हुशार अन प्रामाणिक मुलगा , आज त्याने PHD पूर्ण केली आहे. विजया पाटील म्हणून मुलगी होती तिनेही LLB केल आहे,काही हुशार नसलेली आम्ही मुल कुणी ऑटो चालवतो, विठ्ठल जगदाळे सारखा राजकारणात गेलाय ,,, शिंगणे ac चे काम करतो. आणि मी चित्र काढतो.
प्रत्येक जन काही ना काही उद्योग करतोय.
आम्हा ९ वी अन १० वी ला चांगले शिक्षक हि मिळाले त्यामध्ये बारोटे सर,डोमळे सर हे नाव मी विसरू नाही शकत .
बारोटे सरांनी मला गणिताच्या महत्वाच्या टिप्स देऊन मला सहकार्य केले अन आज हि करत आहेत. मी त्यांच्या मुलीची लग्नाची पत्रिकेसाठी पेंटिंग केल होत तसेच ते सध्या प्राचार्य झालेत. त्यांच्याकडे कला प्रेम खूप मोठयाप्रमाणात आहे.गणिताचे शिक्षक असुन हि त्यांनी अनेक चित्रकाराची पुस्तक वाचली .
आलमेलकरांची तर खूप सारी माहिती आहे त्यांना.
असे कलारसिक शिक्षक माझ्या चित्रकला प्रदर्शनाला मानखुर्द हून अंधेरी ला आले होते. आणि ते हि चक्क नरेंद्र देशमुख यांना घेऊन.
नरेंद्र देशमुख म्हणजे मोठे अधिकारी.
मी दहावीला असताना आमचे मराठी चे शिक्षक डोमळे सर,,खूप चं छान मराठी शिकवायचे त्यांनी शिकवलेले पाठ आज हि मला चांगलेच आठवतात. त्यांनी शिकवलेले आम्हाला स्मशानातल सोन आणि लाल चिखल हे पाठ मी आयष्यात कधीच विसरणार नाही . ते ज्या वेळी शिकवायचे त्या वेळी त्या पात्राशी पूर्णपणे समरस होत असे,,,, या दोन तीन पाठांमुळे त्यांचा मी पक्का चाहता झालो होतो. मी खर तर दहावी च्या परीक्षेत या तीन पाठांवर आलेले तीन मोठे प्रश्न सोडवून च पास झालो.
सरांचे शब्द जणू आज हि कानावर पडतात……. लाल लाल टमाटेsss लाल लाल टमाटेssssस्वस्त लावलेssssss स्वस्त लावले ssssss आठने किलोssss आठने किलोsssss
सर च शिकवण डोळ्यासमोर चित्र उभ करायचं, आणि त्या पाठचा नायक आपण आहोत अस आपणास भासायच ,,मला आजही दर्शनमात्रे हे प्रवास वर्णन आठवत. thanks सर
असे अनेक आठवणीतील शिक्षक आहेत,
प्रकाश बोंबटकर होते ते बोलताबोलता कुठल्याही विषयाची वही तपासून द्यायचे,
चित्रकलेचे पाटील सर होते , वही नाही आणली कि खूप मारायचे ,
शेळके सर यांनी तर आम्हाला रंग पंचमी वर्गात खेळीली म्हणून खूप मारल होत.
सावळे सर,,,जीवशास्त्र शिकवायचे ,
,जिरवणकर मडम ,,,शर्टाची गुंडी लावली नसेल तर पोरीने तोडली काय अश्या म्हणायच्या ,,, शिंदे सर मराठी छान शिकवायचे ,,,त्यांनी शिकविलेले विजयस्तभ आणि राजाभोज हे चांगलाच पाठ झाल होत,
नंदू गायकवाड सर यांनी अर्थशास्त्र शिकविल,,,,,
किती किती शिक्षक अन त्यांची वैशिष्ट सांगितली तर कमी पडेल, भटकर सर भूगोल शिकवायचे डाव्या हाताची ठेऊन,,,,,,
मला निमजे सर आवडायचे ते इंग्लिश खूप चांगल शिकवायचे पण माझ्या नशिबी आलाच नाही त्याच शिकवण,
PTI सुसर सर त्याचं ओल्या फोकीच मारन असो,,,,,,पठाण सर च गाणं
NCC चे निकम सर ,,,भौतिकशास्त्र शिकवताना, ,,,म्हणयचे
" Any Dificulty ,,,, आणि आम्ही हि हुशार मुलांसारखा जणू सर्व समजल अस जोरात म्हणायचो No Dificulty सर."
असो माझ्या शिवाजी शाळेच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे चांगल्या न वाईट.
सुनील बांबल

No comments: