http://sunilbambal.blogspot.in/

Saturday, November 7, 2015

ओवी @ ओवी



माझ लग्न झाले ,,दिपाली सारखी जिवलग साथीदार आयुष्यात लाभली.
दिवस,महिने हळू हळू जात होते ,,आम्ही या काळात वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या,,,हे ठिकाण कधी पर्यटनाची असत तर कधी नातेवाईकांची.
आनंदच आणि उत्साहाचे वातावरण होत काही काळ लोटला मग,,, मुल पाहिजे अस वाटायला लागला.
वानेरे हॉस्पिटल ला गेलो. औषध सुरु झाली ,,,,पण त्या औषध चा त्रास दिपाली ला झाल्याने आम्ही ती बंद केली. मग २-३ महिन्याचा काळ गेला.सकारात्मक रिपोर्ट आल्याने चिखली तील डॉक्टर करवंदे यांचे कडे गेलो,,, सोनोग्राफी केली. मात्र रिपोर्ट एकूण धक्का बसला. बाळ जन्म देण्या योग्य नव्हत.
आम्हाला खूप धक्का बसला.
दिपाली च्या अश्रुकडे पाहत … मी कस बस स्वत: सावरले.
मन मात्र सावरू शकलो नाही.
डॉक्टर काकांनी धीर देत सांगितले ,,,काळजी नका करू.
तुमचे काय वय थोडी झाले ,,,२ महिन्यात तर तुम्हाला गोड बातमी कळू शकते.
५ महिने चा काळ लोटला अन परत एकदा गोड गुड न्यूज मिळाली.
महिन्यामागून महिने जात होते,,,माझ्या बाळाच्या आई ची काळजी ,,,,तिची आई अन माझी आई घेत होती,,आणि मी होतोच.असे दिवस महिने जात होते .

१ दिवस तोरवणे सरांचा फोन आला. तोरवणे सर आणि फासे सर यांनी मला ,,,त्या परिस्थितीत मला विनानुदानित महाविद्यालयावर अधिव्याख्याता म्हणून येण्याचे सांगितले. महिना ४००० मानधन हि देणार होते,,,आणि अनुदान आल्यावर मी कायम होईल असे आश्वासन हि मिळाले होते.
एका मनाची इच्छा नसतानाही,,,दुसऱ्या मनाचे ऐकूण मी गेलो खरा.
पण माझ मन तेथे रमत नव्हते. रात्री झोप यायची नाही,,दिवसभर मी चित्रमय वातावरणात असल्याने बर वाटायचा. पण शनिवार जवळ  आला कि मी activa घेऊन घराच्या दिशेने निघायचो,,,जाणेयेणे ५०० रुपये खर्च करून २ दिवस घरी आल की मन रमायचे. मिळणारे मानधन पुरेसे नव्हते,,वरून साडेतीन चार हजार माझे व्ययक्तिक खर्च व्हायचे. मन मारून कसे बसे २ महिने तेथे अधिव्याख्याता म्हणून राहिलो.
मी औरंगाबाद ला निघालो की माझी बायको नेहमी मन बारीक करायची तिचा चेहरा रडायला आल्यासारखा भरायचा.मला ही निघाव असे वाटेना . तेव्हा ते दोन महिने फार खडतर होते माझ्या कुटुंबासाठी.

पाटील सर निवृत्त होणार होते त्या जागेवर माझा विचार होईल का असं मी एकदा सहज विचारले होतं तेव्हा कळले तेथे दुसऱ्यास भरणार आहे . माझ्या मनाच्या विरुद्ध मी तेथे राहत होतो शेवटी न राहवून मी एक दिवस तोरवणे सरांना म्हणालो दुसरे अधिव्याख्याता बघा.मी येथे नाही थांबू शकत. 
 
तेव्हा तोरवणे सरांना माझ्यामुळे त्रास झाला असेल बहुदा,,,त्याबद्दल मला माफ करावे. सर तुमचा हेतू चांगला होता. मात्र माझ्या परिस्थितीला ते मान्य नव्हते ,,हेच खरे. माझ वय विनानुदानित वर वेळ घालविन्यास योग्य नव्हते. जी डी आर्ट ला अजून ही अनुदानित मान्यता आली की नाही माहीत नाही. 
शरयू जाधव ने बालगंधर्व ला  समूह प्रदर्शन आयोजित केल होत,,,त्या साठी मी पुणे ला गेलो.  प्रदर्शन झाले.पुुणे वरून परतल्यानंतर वासुदेव कामत यांचा डेमो यशवंत ला असल्याने मी थांबलो. यशवंत चा दोन महिने काही दिवस चा अनुभव घेतला. या वेळी मला ना कॉलेज ने ऑर्डर दिली नव्हती. 

परतत असताना मन गहिवरून आल ,,,,,काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मला निरोप द्यायला आले होते.

पालातील राहणारे जसे एक जागा सोडताना जसा घरातील पसारा आपल्या बैलगाडी वा गाढवावर बांधतात जणू काही तसेच सर्व समान मी activa वर लादून निघालो होतो.
मी सर्वांचा निरोप घेतला. आणि माझा अधिव्याख्याता म्हणून सुरू झालेला प्रवास दोन महिने सात दिवसात संपला. मी ५ फेब्रुवारी ला घरी परतलो.
          ६ फेब्रुवारी डॉक्टर ने दिलेली तारीख उलटली,,,,दुसऱ्या दिवशी ७ फेब्रुवारी २०१५ ला ७ वाजून ४२ मिनिटांनी ,,,ओवीचा जन्म झाला . माझा आनंद गगनात मावेनासा होता.whats app ने ती मला प्रथम दिसली ,,,पण प्रत्यक्ष पाहण्यासाठी रात्र आडवी आली होती,,,मी रात्रीच येऊ नये सांगितल्याने. दुसऱ्या दिवशी मी बुलडाणा येथे गेलो ,,,,आणि ओवी ला ओंजळीत घेऊन सुखावलो.
तिने जीवनच पालटून टाकले.
ती ओवी आज ९ महिने पूर्ण झाली,,,,,तिचा हा १८ महिन्याचा काळ आमच्या साठी.
न विसरण्या सारखाच .
सुनिल बांबल ७/११/२०१५

No comments: